अशोक शिंदे
अशोक शिंदे
संस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी ब्रिगेड • सचिव, रेड स्वस्तिक सोसायटी (महाराष्ट्र)
📍सध्याचे निवासस्थानत्र्यंबक नगर, महाबल परिसर, जळगाव
🏡मूळ गावअंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा
📞संपर्क+91 94222 83233
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा — श्री. अशोक शेषराव शिंदे
गेली ३२ वर्षे अखंड समाजकारण

श्री. अशोक शेषराव शिंदे

मान • मणका • मेंदू • मनगट — मजबूत समाजासाठी

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राज्य व देश पातळीवर आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी झटणारे प्रखर, आक्रमक व अभ्यासपूर्ण वक्ते.

कार्य पाहासंपर्क करा
रेड स्वस्तिक सोसायटी

आरोग्य सेवा

१७,४४८ अपंगांना कृत्रिम पाय • १८,६३० नेत्र शस्त्रक्रिया

हजारो आरोग्य शिबिरे, नामवंत हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि कुंभमेळ्यांत २६ लाख लोकांना थेट सेवा.

आरोग्य सेवा पाहा
रोजगार व लोकहितवादी लढे

१३,०००+ युवकांना रोजगार

बेरोजगार मेळावे • शिवनेरी-रायगड डागडुजी • महामार्ग सुरक्षेचा लढा

ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोफत रोजगार मेळावे आणि अन्यायाविरुद्ध यशस्वी आंदोलने.

आंदोलने पाहा
32वर्षे समाजकार्य
17,448अपंगांना कृत्रिम पाय व साहित्य
18,630नेत्र शस्त्रक्रिया
13,000+बेरोजगार युवकांना रोजगार
17,364फाटलेले ओठ-टाळू मोफत शस्त्रक्रिया
912मोफत हृदय शस्त्रक्रियांसाठी मदत
26 लाखकुंभमेळ्यात थेट आरोग्य सेवा
68,000वृक्षारोपण व संवर्धन
थोडक्यात परिचय — श्री. अशोक शेषराव शिंदे

कार्यक्षेत्रे

समाजासाठी अखंड, अहोरात्र — 100% समाजकारण

सामुदायिक विवाह सोहळे

खान्देश व मराठवाड्यात सर्वप्रथम सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ; महाराष्ट्रात प्रथमच पुनर्विवाह सामुदायिक सोहळा.

अधिक →

बेरोजगार मेळावे

एकाच वेळी 3000 बेरोजगारांना रोजगार; आजपर्यंत 13,000+ ग्रामीण युवकांना मोफत रोजगार.

अधिक →

आरोग्य सेवा

रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून हजारो आरोग्य शिबिरे आणि नामवंत हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया.

अधिक →

लोकहितवादी आंदोलने

शिवनेरी-रायगड डागडुजी, शहाजी महाराजांची गढी, महामार्ग सुरक्षेसाठी यशस्वी लढे.

अधिक →

शिक्षण व युवक

दत्तक योजना, स्पर्धा परीक्षा केंद्रे, मोफत वाचनालये आणि अभ्यासिका.

अधिक →

पुरस्कार व सन्मान

राष्ट्रीय मराठा भूषण, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, राजभवनात कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार.

अधिक →

प्रमुख पदे

संस्थापक-अध्यक्षछत्रपती शिवाजी ब्रिगेड
सचिव (Secretary)रेड स्वस्तिक सोसायटी — व्यवस्थापकीय समिती, महाराष्ट्र
संपादकमराठा लाईव्ह न्यूज
विश्वस्तसूर्या चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
विश्वस्तहिंदू रिसर्च फाउंडेशन, मुंबई
संस्थापक समन्वयक तथा संकल्पकसंभाजी ब्रिगेड

सर्व पदे पाहा

फोटो झलक

संपूर्ण गॅलरी

वृत्तपत्रांत दखल

कल्याण ग्रामीण भागात महारोजगार मेळावा

रेड स्वस्तिक सोसायटीचा उपक्रम

हरिद्वार महाकुंभ — मोफत आरोग्यसेवा

लाखो भाविकांना सेवा

परिचय

श्री. अशोक शेषराव शिंदे

श्री. अशोक शेषराव शिंदे
मूळ गाव: अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा
सध्याचे निवासस्थान: ८, विश्वदीप अपार्टमेंट, त्र्यंबक नगर, महाबल परिसर, जळगाव

गेली 32 वर्षे राज्य पातळीवर आणि देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि तरुणांसाठी त्यांचा मान, मणका, मेंदू आणि मनगट मजबूत तसेच सशक्त करण्याच्या उदात्त हेतूने समाजकार्य.

प्रखर, आक्रमक व अभ्यासपूर्ण वक्ते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील मूळ प्रश्नांवर — म्हणजेच आरोग्य आणि रोजगार या विषयांवर — प्रचंड काम. यासाठी गरजेच्या असलेल्या वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळींचा हजारो कार्यकर्त्यांसह उभा केलेला सशक्त परिवार.

त्याचप्रमाणे अन्यायग्रस्त लोकांसाठी केलेली लोकहितवादी आंदोलने आणि उभारलेले मोठे लढे; समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा यांविरोधात केलेली अनेक आंदोलने आणि उपाययोजना — खान्देश आणि मराठवाड्यात सर्वप्रथम सामुदायिक विवाह सोहळ्याची रोवलेली मुहूर्तमेढ व सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ, तसेच महाराष्ट्रात प्रथमच पुनर्विवाह सामुदायिक सोहळ्याचे आयोजन.

समाजासाठी अखंड, अहोरात्र झटत, 100% समाजकारण करत असलेली कामे — अत्यंत निडर, आक्रमक, तरीही कुठल्याही स्वार्थाविना, कुठल्याही लालसेविना, स्वच्छ प्रतिमेसह.

32वर्षे समाजकार्य
13,000+युवकांना रोजगार
11ठिकाणी सामुदायिक विवाह
68,000वृक्षारोपण

सामाजिक उपक्रम

अशोक शिंदे यांनी राबविलेले विविध सामाजिक उपक्रम

सामुदायिक विवाह सोहळे

खान्देश आणि मराठवाड्यात सर्वप्रथम सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली आणि सामुदायिक विवाहाची चळवळ उभी केली. महाराष्ट्रात प्रथमच पुनर्विवाह सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केले. खालील ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे झाले:

जळगाव शहरमामळदे, ता. चोपडाचोपडा शहरवडगाव, ता. चोपडापाचोरा शहरवाडी शेवाळे, ता. चोपडागाळण, ता. पाचोरानांद्रा, ता. जामनेरभुसावळअमळनेरसंभाजीनगर

बेरोजगार मेळावे

जळगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने “मराठा महोत्सवा” अंतर्गत एकाच वेळी 3000 बेरोजगारांना कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांच्या उपस्थितीत विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून उपक्रमाची सुरुवात.

यासह राज्यभरात ग्रामीण भागात आजपर्यंत किमान 13,000 बेरोजगार युवकांना मोफत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन.

जळगावधुळेबीडनागपूरसिंदखेडराजापैठणपारोळाकल्याणपुणे

शिक्षण व युवक

  • होतकरू, अभ्यासू आणि हुशार असलेल्या परंतु गरिबीने नाडलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबवून अनेक व्यक्तिमत्त्वांच्या सहकार्याने समाजात डॉक्टर, इंजिनिअर, शासकीय अधिकारी घडवून आदर्श निर्माण केला.
  • स्टडी सर्कलसारख्या संस्थांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे, मोफत वाचनालये आणि अभ्यासिका सुरू केल्या.
  • पारधी समाजाच्या मुलांना शैक्षणिक मदत.

इतर उपक्रम

  • सैन्यभरतीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या 72 हजार तरुणांना दहा दिवस जेवणाच्या पाकिटांचे वाटप.
  • पुणे ते पंढरपूर आणि पैठण ते पंढरपूर आषाढी वारीसाठी गेली 16 वर्षे तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत आरोग्य सेवा, औषधे, रुग्णवाहिका सेवेसह जेवण आणि कंबल वाटप.
  • जळगावमध्ये प्रथमच सामाजिक एकोप्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन जिल्हास्तरीय सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव सुरू केला.
  • पर्यावरणाच्या बळकटीसाठी 68 हजार वृक्षांचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी रोपण व संवर्धन — शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून.

आरोग्य सेवा

“रेड स्वस्तिक सोसायटी”च्या माध्यमातून मानवतावादी आरोग्य सेवा

17,448अपंगांना कृत्रिम पाय आणि साहित्य देऊन सक्षम करण्याचा यशस्वी उपक्रम (महाराष्ट्रभर)
18,630व्यक्तींच्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे यशस्वी आयोजन
14,753हृदयरोगी रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांसह तपासणी; 912 रुग्णांना मुंबईतील नामवंत हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी (बायपास, अँजिओप्लास्टी, हृदयाला छिद्र) मदत
563मणका व मेंदूच्या आजाराने ग्रस्त लोकांना मोफत शस्त्रक्रिया
21,937लाभार्थी — उत्तर महाराष्ट्रातील पहिले ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरील डायलिसिस सेंटर, जळगाव
458जन्मतः अपंगत्व आणि व्यंग असलेल्या बालकांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
17,364जन्मतः फाटलेले ओठ व टाळू असलेल्या उपेक्षितांवर मोफत शस्त्रक्रिया — सौंदर्य प्राप्त करून सामाजिक प्रवाहात आणले
26 लाखहरिद्वार, उज्जैन, नाशिक, प्रयागराज कुंभमेळ्यांत लोकांना थेट आरोग्य सेवा
15,000+रक्तदात्यांचे रक्तदान — अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे
  • बिहारमधील कोसी नदीच्या महापुरातील पूरग्रस्त नागरिकांना जीव धोक्यात घालून डॉक्टरांची टीम पाठवून वैद्यकीय सेवा.
  • ओरिसा राज्यातील अत्यंत दुर्गम नक्षलग्रस्त भागात सलग 20 दिवस वैद्यकीय सेवा — 6,205 लाभार्थी.
  • अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये सलग चार वर्षे 32 गावांतील 4,605 कुपोषित बालकांना आरोग्य सेवा देऊन ‘आत्मा प्रोजेक्ट’ची उभारणी.
  • राज्यभर महाशिबिरांचे यशस्वी आयोजन — सहा लाख रुग्णांची यशस्वी तपासणी व उपचार.

आंदोलने

अन्यायग्रस्तांसाठी लोकहितवादी आंदोलने आणि मोठे लढे

  • उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील 5 हजार तरुणांना घेऊन, महाराष्ट्राने दुर्लक्षित केलेली उपेक्षित जागा — शहाजी महाराजांची वेरूळ घृष्णेश्वर येथील गढी — पुनर्जीवित करून ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आंदोलन.
  • शिवनेरी आणि रायगडाच्या डागडुजीसाठी लढा.
  • जळगाव–अजिंठा, धुळे–भुसावळ महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यासाठी उभारलेला मोठा लढा यशस्वी केला.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी यशस्वी लढा.

आंदोलनांमुळे झालेले सामाजिक बदल (शासन निर्णय इ.)

शिवनेरी सुशोभीकरणआंदोलनामुळे शासनाला समिती गठित करून IFS दर्जाचा अधिकारी नेमून कार्याला सुरुवात करावी लागली.
समांतर रस्ताजळगाव–अजिंठा, धुळे–भुसावळ महामार्गावर समांतर रस्त्यासाठीच्या आंदोलनामुळे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दखल घेत रस्त्यांबाबत आदेश जारी केले.

संस्था व पदे

उभ्या केलेल्या / ताकद दिलेल्या संस्था आणि भूषविलेली पदे

पदे

संस्थापक-अध्यक्षछत्रपती शिवाजी ब्रिगेड
संपादकमराठा लाईव्ह न्यूज
सचिव (Secretary)रेड स्वस्तिक सोसायटी — व्यवस्थापकीय समिती, महाराष्ट्र
विश्वस्तसूर्या चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
विश्वस्तहिंदू रिसर्च फाउंडेशन, मुंबई
प्रकल्प संचालकइंडियन स्काऊट अँड गाईड फेलोशिप
संचालकखान्देश रायफल असोसिएशन
संचालकएन टी पी एस (भरतीपूर्व केंद्रीय प्रशिक्षण केंद्र), नागपूर
संचालकशिवालय वृद्धाश्रम, कल्याण
माजी जिल्हा सचिवमराठा सेवा संघ, जळगाव
संस्थापक समन्वयक तथा संकल्पकसंभाजी ब्रिगेड

उभ्या केलेल्या / ताकद दिलेल्या संस्था

अखिल भारतीय काशी-कापडी समाज
गवळी समाज संघटना
कोळी समाज संघटना
पारधी समाज संघटना

पुरस्कार व सन्मान

अशोक शिंदे यांना मिळालेले पुरस्कार

अ.भा. मराठा सेवा संघाचा राष्ट्रीय मराठा भूषण पुरस्कार, मुंबई
मुंबई राजभवनात महामहिम राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार
राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
रेड स्वस्तिकचा बेस्ट अचिव्हमेंट राष्ट्रीय पुरस्कार
जिल्हा पोलीस दलाकडून विशेष सन्मान
शिवपुत्र संभाजी राजे पुरस्कार, नाशिक
दर्जी फाउंडेशन पुरस्कार
नवनाथ पुरस्कार, अहमदनगर
मराठा सन्मान पुरस्कार, चोपडा

सन्मान सोहळे

फोटो गॅलरी

580 फोटो — ५ विभागांत, क्लिक केल्यावर मोठा दिसेल

कात्रणे व पत्रे

वृत्तपत्रांनी घेतलेली दखल, प्रशस्तिपत्रे, कौतुकपत्रे व कार्यक्रम पत्रिका

वृत्तपत्र कात्रणे

96 कात्रणे

प्रशस्तिपत्रे व पत्रे

73 पत्रे व पत्रिका

संपर्क

कार्यक्रम, व्याख्यान, आरोग्य शिबिर किंवा मदतीसाठी

संपर्क तपशील

📍 सध्याचे निवासस्थान: ८, विश्वदीप अपार्टमेंट, त्र्यंबक नगर, महाबल परिसर, जळगाव — फोन ०२५७-२२६३५२८

🏡 मूळ गाव: अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा

📞 +91 94222 83233

ashok.shinde124@gmail.com

कॉल करा

संदेश पाठवा

मनोगत

श्री. अशोक शेषराव शिंदे यांच्या शब्दांत

श्री. अशोक शेषराव शिंदे
श्री. अशोक शेषराव शिंदेसंस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी ब्रिगेड

नमस्कार,

अंजनी बु. या बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा गावात माझा जन्म झाला. गावाकडचं आयुष्य मला लहानपणीच दोन गोष्टी शिकवून गेलं — पहिली, माणसाला मोठं करणारी त्याची जात नसते, त्याचं काम असतं; आणि दुसरी, गरिबी ही माणसाची चूक नसते, ती व्यवस्थेची चूक असते. हे दोन विचार घेऊनच मी घराबाहेर पडलो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हाच माझा आधार. महाराजांनी रयतेला उभं केलं — तसंच आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला उभं करायचं, हा ध्यास घेऊन गेली ३२ वर्षे मी काम करतो आहे. माझं सूत्र साधं आहे — माणसाचा मान, त्याचा मणका, त्याचा मेंदू आणि त्याचं मनगट — हे चार मजबूत झाले, की तो माणूस कोणापुढे झुकत नाही.

काम करताना लक्षात आलं की ग्रामीण भागाचे खरे प्रश्न दोनच आहेत — आरोग्य आणि रोजगार. आजारपण आलं की घरातलं सोनं जातं, शेत जातं, आणि पोरांचं शिक्षण थांबतं. रोजगार नसला की तरुणाच्या हातातलं कर्तृत्व वाया जातं. म्हणून रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, अपंग बांधवांना कृत्रिम पाय, आणि मेळाव्यांतून तरुणांना रोजगार — हेच माझं रोजचं काम झालं.

अनिष्ट रूढींविरुद्ध बोलणं सोपं असतं, त्या मोडून दाखवणं अवघड. म्हणून खान्देश आणि मराठवाड्यात सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ रोवली, आणि महाराष्ट्रात प्रथमच पुनर्विवाहाचा सामुदायिक सोहळा घडवून आणला. अन्याय दिसला तिथे रस्त्यावर उतरलो, आणि ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित होताना दिसला तिथे लढा दिला.

हे सगळं मी एकट्याने केलं असं मी कधीच म्हणणार नाही. माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते उभे राहिले, अनेक हात मदतीला आले, आणि अनेक कुटुंबांनी आपलं मानलं. हे यश माझं नाही, ते या परिवाराचं आहे.

अजून खूप काम बाकी आहे. जोपर्यंत शरीर साथ देतं, तोपर्यंत हे काम थांबणार नाही.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभुराजे ! जय ताराराणी साहेब !

सर्व मान्यवरांना

आज माझे स्नेही, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते, रेड स्वस्तिक सोसायटीचे माझे सहकारी, विवेकानंद क्लासेसचे संचालक आणि गणित व फिजिक्सचे तज्ज्ञ प्रा. श्री. संदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा गेल्या ३२ वर्षांचा सामाजिक प्रवास या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास अर्पण करीत आहे.

मी गेल्या ३२ वर्षांत समाजातल्या तळागाळापासून तर अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्य करू शकलो आहे.

यामागे माझी मुख्य प्रेरणा म्हणजे माझे वडील स्व. शेषरावजी शिंदे, माझी माई स्व. लिलाबाई शिंदे, आणि माझ्या उपक्रमांना भरभरून आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे माजी अप्पर पोलीस महासंचालक, रेड स्वस्तिक सोसायटीचे संस्थापक, हिंदू रिसर्च फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे मुख्य मार्गदर्शक डॉ. श्री. टी. एस. भाल साहेब — यांच्यासह अनेकांचे आशीर्वाद मला कायम लाभले.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभुराजे !
— अशोक शेषराव शिंदेसंस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी ब्रिगेड
सचिव, रेड स्वस्तिक सोसायटी (महाराष्ट्र)
वेबसाइट करणाऱ्याचे मनोगत
प्रा. संदीप अमृत पाटील
प्रा. संदीप अमृत पाटीलमुख्य प्रवक्ते, छत्रपती शिवाजी ब्रिगेड
संचालक, विवेकानंद क्लासेस

एक चालते-बोलते विद्यापीठ

नमस्कार, मी प्रा. संदीप अमृत पाटील. M.Sc. (Physics), M.S. (Psychotherapy & Counselling), B.Ed. असं शिक्षण घेतलं, मोठ्या विद्यापीठाची पदवी घेतली, आणि २००५ पासून महाराष्ट्रभर दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सेमिनार घेतले. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो — मी जे खरं शिक्षण घेतलं ते अशोक शिंदे साहेब नावाच्या विद्यापीठात.

साहेब हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. पदवी देणारी विद्यापीठं ज्ञान देतात; हे विद्यापीठ माणूस घडवतं.

माणसाशी माणसासारखं वागणं

एक माणूस दुसऱ्या माणसाशी किती चांगल्या प्रकारे वागू शकतो, याचं उत्तर साहेबांच्या वागण्या-बोलण्यात मिळतं. साहेबांचा संपर्क समाजातील अत्यंत उच्चपदस्थ आणि अतिश्रीमंत लोकांशी येतो, आणि तेवढाच गोरगरीब माणसांशीही. मी जवळून पाहिलं — दोघांशीही त्यांचं वागणं तंतोतंत एकसारखं असतं. मदतीला धावून जाताना ते कधी विचारत नाहीत की माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, गरीब आहे की श्रीमंत. समोरचा माणूस आहे — एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं असतं, आणि तो कोणीही असो, त्याला सन्मानानेच वागवलं जातं.

२४ तास सुरू असलेला फोन

साहेबांचा मोबाईल एक मिनिटही बंद नसतो. फोन गरजू माणसाचा असो, कार्यकर्त्याचा असो किंवा अगदी अनोळखी माणसाचा — ते मीटिंगमध्ये असोत, एखाद्या अधिकाऱ्यासमोर असोत की मंत्र्यांसमोर — फोन लगेच उचलणार, समोरचं म्हणणं शांतपणे पूर्ण ऐकून घेणार, आणि ते काम होण्यासारखं असेल तर त्याच क्षणी त्याला हात घालणार. माझ्यासमोर कितीतरी वेळा हे घडलं आहे — कोणाचं हॉस्पिटलचं काम, कोणाचं ऑपरेशन, कोणाची अचानक आलेली अडचण — साहेब लगेच उभे राहिले. आणि यासाठीचा प्रवास सतत सुरू असतो — आज मुंबई, उद्या पुणे, परवा दिल्ली, त्यानंतर हैदराबाद.

मी नेहमी गमतीने म्हणतो — मी एक लेक्चर घेतो, तोपर्यंत साहेब हजारो किलोमीटर प्रवास करून परत आलेले असतात. साहेबांचा आजवरचा प्रवास एका रेषेत मांडला, तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत — तब्बल ३ लाख ८४ हजार किलोमीटर — सहज पोहोचून झालं असतं.

शिकण्यासारख्या गोष्टी

  • कोणापुढे लाचारी नाही. आयुष्य सन्मानाने जगायचं. साहेबांनी कोणाचीही हुजरेगिरी कधी केली नाही.
  • श्रेय स्वतःकडे घ्यायचं नाही. एवढं काम करूनही “मी केलं” असं त्यांच्या तोंडून कधी ऐकलं नाही.
  • राजकारणापेक्षा समाजकारण. राजकारणातली मोठी पदं अनेकदा त्यांच्या दारापर्यंत चालत आली; पण त्यांनी समाजसेवाच निवडली.
  • भगिनींचा सन्मान. आपल्या भगिनींशी कसं वागायचं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

विश्वमित्र आणि सोशल इंजिनिअर

त्यांच्या कामामुळे अवघा मित्रपरिवार जोडला गेला आहे. म्हणून मी त्यांना “विश्वमित्र” म्हणतो. माणसं जोडणं ही एक कला आहे, आणि ती त्यांना साधली आहे. डॉक्टर, वकील, अधिकारी, प्रतिष्ठित मंडळी, शेतकरी आणि गरीब घरातला सामान्य माणूस — या सगळ्यांना ते “आपले” वाटतात. म्हणून मी त्यांना “सोशल इंजिनिअर” म्हणतो.

हे सगळं सांभाळत असताना त्यांनी कुटुंबही तेवढ्याच निष्ठेने जपलं. मुलांवर चांगले संस्कार केले, उत्तम शिक्षण दिलं, आणि आज ती उच्च पदांवर काम करत आहेत. एवढं सगळं करूनही मी या माणसाला कधी थकलेलं पाहिलं नाही.

काम मोठं, राहणी साधी

मोठं मन, मोठं काम — पण अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तळागाळातल्या माणसाला मदत करणारे, आणि त्याचवेळी गुंडगिरीविरुद्ध, गैरकानूनी कामांविरुद्ध व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे.

“गैरकानूनी काम स्वतः करायचं नाही, आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही.”

त्यांच्या याच कर्तृत्वातून छत्रपती शिवाजी ब्रिगेड ही आज नावलौकिक असलेली संघटना उभी राहिली. त्यांचे गुरू डॉ. टी. एस. भाल साहेब यांचं मार्गदर्शन ते सातत्याने घेत असतात, आणि त्याच मार्गदर्शनातून जगप्रसिद्ध रेड स्वस्तिक सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी उभं केलेलं काम या वेबसाइटवर तुम्हाला पाहायला मिळेल.

ही वेबसाइट का?

साहेब लेखक आहेत, कवी आहेत आणि उत्तम मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. स्टेजवर उभं कसं राहायचं हे मी त्यांच्याकडूनच शिकलो, आणि पुढे महाराष्ट्रातला नामांकित मोटिव्हेशनल स्पीकर झालो. याची खात्री तुम्ही speakersandeep.com वर जाऊन करू शकता.

असा माणूस समाजात फार क्वचित घडतो. येणाऱ्या Gen Z पिढीला, आणि आज काम करणाऱ्या Gen Y व Gen X ना त्यांचा प्रवास कमी पडू नये, दिशा मिळावी — यासाठी साहेबांचा गेल्या ३२ वर्षांचा हा प्रवास एकत्र करून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही वेबसाइट मी स्वतः तयार केली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहे. माझ्या मनाला हवासा वाटणारा खरा मित्र म्हणजे अशोक शिंदे.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभुराजे !
— प्रा. संदीप अमृत पाटीलM.Sc. (Physics), M.S. (Psychotherapy & Counselling), B.Ed.
मुख्य प्रवक्ते, छत्रपती शिवाजी ब्रिगेड • संचालक, विवेकानंद क्लासेस • speakersandeep.com

संदेश

श्री. अशोक शेषराव शिंदे यांचा संदेश आणि मान्यवरांचे शब्द

श्री. अशोक शेषराव शिंदे
श्री. अशोक शेषराव शिंदेसंस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी ब्रिगेड

तरुण मित्रांनो,

तुमच्या हातात जे आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही — तुमचं शिक्षण, तुमचं कौशल्य आणि तुमचं चारित्र्य. या तीन गोष्टींवर मेहनत घ्या, बाकी सगळं आपोआप मिळेल.

आजची सगळ्यात मोठी गरज स्वावलंबन ही आहे. नोकरी मिळेपर्यंत थांबू नका — कौशल्य शिका, हात चालवा, स्वतःच्या पायावर उभे रहा. आणि उभे राहिल्यावर मागे वळून पाहा; तुमच्या मागे उभं राहायला अजून कोणीतरी वाट पाहत आहे.

समाजाला माझा संदेश

  • आरोग्य ही चैन नाही, तो हक्क आहे. आपल्या गावातला एकही रुग्ण केवळ पैशाअभावी उपचाराविना राहू नये, एवढं आपण नक्की करू शकतो.
  • मुलगी शिकली तर घर उभं राहतं. लग्नाचा खर्च कमी करा, शिक्षणाचा खर्च वाढवा.
  • जात विचारण्यापेक्षा गरज विचारा. ज्याला मदत हवी तो आपला, हाच खरा धर्म.
  • वृक्ष लावा आणि जगवा. लावलेलं झाड जगलं नाही तर ती फक्त फोटोपुरती सेवा ठरते.
छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना जयंतीच्या मिरवणुकीत नाही — ती एखाद्या गरजू माणसाला उभं करण्यात आहे. महाराजांचा विचार घरात नको, तो कामात दिसला पाहिजे.

चला, एकत्र येऊ. काम मोठं आहे, पण हात जोडले की ते नक्की होईल.

— अशोक शेषराव शिंदेसंस्थापक-अध्यक्ष, छत्रपती शिवाजी ब्रिगेड

मान्यवरांचे शब्द

प्रकाशित लेखातून

“गांजलेल्या माणसांनो, थांबवा आक्रोश आता! मी नव्या न्यायालयाची बातमी काढीत आहे!!”

अशोकजी, एखादी गोष्ट ठरवली तर ती तशीच पूर्णत्वास आणण्याचं कसब अन् कर्तृत्व तुमच्या शब्दांत, डोळ्यांत व मनगटात आहे, ह्याची प्रचिती आली. हे काम निश्चित “येऱ्या गबाळ्याचं” नव्हतंच मुळी! तेथे “जातीवंत”च हवा!

अतिशय शिस्तबद्ध अन् नियोजनानं काम करण्याची व करवून घेण्याची तुमची हातोटी निव्वळ लाजवाब आहे, ह्यात वादच नाही. जो माणूस जोडला, तो कायम आपला ह्या नात्यानं तुम्ही प्रत्येकाशी मित्र ह्या नात्यानं राहता.

शरीरानं अन् मनानंही पंगू असणाऱ्या ह्या समाजाला धैर्य देण्याचं अन् त्यासाठी तसा आदर्श डोळ्यांसमोर उभा करण्याचं आव्हान तुम्ही सहज पेलता! हा एक अनोखा गुण आहे. राष्ट्रभक्ती, देशभक्ती कशी असावी तर ती अशी — हे तुम्ही “शंभू राजे”च्या रूपानं सर्वांसमोर उभं केलंत! शाब्बास!!

— डॉ. राजेंद्र प्र. आठवले(राजेंद्र, सौ. तेजश्री — शिवजयंती २०१०)
लेख पान १लेख पान २

आणखी मान्यवरांचे संदेश आले की ते इथे कार्डाच्या रूपात जोडले जातील.

प्रेरणा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज — स्वराज्यासाठीचे अमर बलिदान

॥ श्री ॥

छत्रपती संभाजी महाराज

जन्म: १४ मे १६५७, किल्ले पुरंदर
बलिदान: ११ मार्च १६८९, तुळापूर
ग्रंथ: ‘बुधभूषण’

शिवछत्रपतींचा शत्रू, स्वराज्याचा आणि स्वाभिमानाचा वैरी असलेला औरंगजेब हा मुघलांचा बादशहा होता. त्याने शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी अनेक डावपेच रचले. पण त्यांच्या सर्व डावपेचांना छत्रपतींनी चतुराईने, धैर्याने आणि पराक्रमाने परतवून लावले.

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीवर वारसदार म्हणून संभाजी महाराज बसले. ते निर्भय, धाडसी, शूर आणि अत्यंत बुद्धिमान होते. लहानपणापासूनच त्यांना युद्धकलेचे, राज्यकारभाराचे आणि धर्मशिक्षणाचे संस्कार मिळाले होते. शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचा वारसा दिला आणि स्वराज्याचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली.

संभाजी महाराजांनी आपल्या पित्याच्या कार्याला पुढे नेले. त्यांचा शत्रू औरंगजेब याने स्वराज्याविरुद्ध अनेक कट रचले. पण संभाजी महाराजांनी प्रत्येक वेळी शत्रूच्या डावांना चोख प्रत्युत्तर दिले. ते केवळ शूर योद्धेच नव्हते, तर कुशल राजकारणीही होते.

संभाजी महाराजांनी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. त्यांनी दक्षिणेत मुघलांच्या सैन्याला अनेकदा पराभूत केले आणि स्वराज्याचा विस्तार केला. ते विद्वान, कवी, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय होते. संस्कृत, मराठी आणि फारसी भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘बुधभूषण’ हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथकार्य आहे.

औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी संग्रामात त्यांना पकडण्यात आले. मात्र कितीही यातना दिल्या तरीही त्यांनी स्वराज्याच्या गुपितांची माहिती दिली नाही. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाच्या आदेशाने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पण संभाजी महाराजांचे बलिदान अमर झाले — त्यांच्या त्यागामुळे स्वराज्याची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित झाली.

छत्रपती संभाजी महाराज हे खरे ‘धर्मवीर’ होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि बलिदानाने महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण ठसा उमटवला. आजही त्यांचे जीवन आणि त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.

“धर्मासाठी लढा, स्वराज्यासाठी जगा —
हाच संभाजी महाराजांचा अमर संदेश!”

शंभूराजांचा विचार — आमच्या कामाची प्रेरणा

छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेली ३२ वर्षे जे काम उभे राहिले, त्याची मूळ प्रेरणा हीच आहे — शिवरायांचा विचार आणि शंभूराजांचा त्याग. महाराजांना खरी मानवंदना मिरवणुकीत नाही, ती गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहण्यात आहे.

॥ जय शिवराय — जय शंभूराजे ॥

व्हिडिओ व बातम्या

फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम व्हिडिओ आणि वृत्तपत्रांच्या ऑनलाइन बातम्या

व्हिडिओ पाहा

बटणावर क्लिक केल्यावर व्हिडिओ त्या-त्या ॲपमध्ये उघडेल

🎥

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : छत्रपती शिवाजी ब्रिगेड

🎥

रेड स्वस्तिक सोसायटीच्या मदतीने शेकडो दिव्यांग होणार सक्षम!

🎥

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर कायमस्वरूपी बडतर्फ — ब्रिगेडच्या आंदोलनाला यश

🎥

हिंदू रिसर्च फाउंडेशनतर्फे भारतीय शास्त्रज्ञांना अभिवादन — भारतीय संस्कृतीतील संशोधन परंपरा

🎥

प्रशिक्षणाशिवाय मणियार बंधूंना पिस्तुल परवाना कसा? — अशोक एस. शिंदे यांचा सवाल (पत्रकार परिषद)

🎥

रामदेववाडी दुर्घटना — मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

🎥

मुक्ताईनगर ते शहापूर महामार्गाचे काम — तहसीलदारांची पाहणी

🎥

अवघ्या दोनशे रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला लिज्जत समूह — सुरेश कोते यांचे व्याख्यान

ऑनलाइन बातम्या

लाईव्ह ट्रेंड्स न्यूज व इतर

📰

अशोक शिंदे यांना पुण्यात ‘शंभू शौर्य पुरस्कार’ प्रदान

📰

जामनेरमध्ये सकल मराठा समाजाची भव्य बैठक उत्साहात

📰

धोकादायक फटाका कारखाने तातडीने हटवा! छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

📰

विद्यापीठात बंद असलेल्या अंतर्गत बस सेवेमुळे विद्यार्थिनींचा संताप; शिवाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

📰

जिल्हा बँकेची नोकर भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत घ्या : छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

📰

प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी करा : छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी

📰

जळगावकरांनो, असे चिरडून मरणे किती काळ सहन करणार? (ब्लॉग)

📰

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

कार्यक्रम / व्याख्यानासाठी निमंत्रण द्या

आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा किंवा सामाजिक उपक्रमासाठी संपर्क साधा

संपर्क करा